सोयाबीनच्या हमीभावात ४३६ तर कापसात ५८९ रुपयांची वाढ; तुरीला ८ हजार रुपये हमीभाव, बुडत्या शेतकऱ्याला काडीचा आधार
सोयाबीनच्या हमीभावात ४३६ तर कापसात ५८९ रुपयांची वाढ; तुरीला ८ हजार रुपये हमीभाव, बुडत्या शेतकऱ्याला काडीचा आधार
नवी दिल्ली
केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात ४३६ रुपयांची तर कापसाच्या हमीभावात ५८९ रुपयांची वाढ केली. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव असनार आहे. लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपये हमीभाव मिळणार आसुन तुरीचा हमीभावही ८ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. या हमी भावाने बुडत्या शेतकऱ्याला काडीचा आधार मिळाला असं म्हणावे लग्गेल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२५-२६ खरीप हंगामासाठी १४ पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजेच हमीभाव बुधवारी (ता.२८) जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये हमीभावाला मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ४३६ रुपयांची वाढ केली. सोयाबीनचा हमीभाव आता ५ हजार ३२८ रुपये झाला आहे. तर मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५८९ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी ७ हजार ७१० रुपये हमीभाव असणार आहे. तर लांब धाग्याच्या कापसासाठी ८ हजार ११० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.
तुरीच्या हमीभावातही ४५० रुपयांची वाढ करण्यात आली. तुरीचा हमीभाव यंदाच्या खरिपात ८ हजार रुपये असणार आहे. तर मक्याच्या हमीभावातही १७५ रुपयांची वाढ करण्यात आली. मक्याचा हमीभाव आता २४०० रुपये झाला आहे. ज्वारीच्या हमीभावातही ३२८ रुपयांची वाढ करण्यात आली. हायब्रीड ज्वारीला आता ३ हजार ६९९ रुपये हमीभाव असेल. तर मालदांडी ज्वारीला ३ हजार ७४९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.
हमीभाव वाढीविषय़ी माहिती देताना केंद्रीय माहीती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन हमीभाव जाहीर केली आहे. हमीभाव ठरवताना कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव जाहीर केला आहे. यामध्ये मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत मागणी, जागतिक बाजारभाव, जागतिक बाजारातील घडामोडी, तसेच पाणी, जमीन यांचा विचार करून आयोगाकडून शिफारस केली जाते.”
