अंबाजोगाई शहरात बसवण्यात येत असलेले स्मार्ट वीज मीटर त्वरित थांबवण्यात यावे मागणीसाठी विषय आहे राजकिशोर मोदी मित्र मंडळ आक्रमक
- अंबाजोगाई शहरात बसवण्यात येत असलेले स्मार्ट वीज मीटर त्वरित थांबवण्यात यावे मागणीसाठी विषय आहे राजकिशोर मोदी मित्र मंडळ आक्रमक
अंबाजोगाई (प्रतिनिधी )
अंबाजोगाई नवीन स्मार्ट मीटर बसविणे त्वरित थांबवण्यात यावे, वीज बिलात विविध प्रकारच्या आकारण्या लावून
जी ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे ती थांबवण्यात यावी आशी मागणी राजकिशोर पापा मोदी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
अंबाजोगाई येथील कार्यकारी अभियंता यांच्या वतीने उप कार्यकारी अभियंता बोबडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की अंबाजोगाई शहरात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू आहे, जुने मीटर काढून नवीन मीटर का बसविले जात आहे हा प्रश्न वीज ग्राहकात निर्माण झाला आहे. यामुळे ग्राहकात नाराजी निर्माण होऊन ओरड होत आहे. तसेच जुन्या मीटरची रीडिंग नवीन मीटर च्या बिलात देत असताना जुन्या रीडिंग चा ताळमेळ बसत नाही. यामुळे ज्यादा बिल येत आहेत. तेव्हा योग्य ती काळजी घेऊन ग्राहकाचे समाधान करून बिल द्यावे जेणेकरून आर्थिक लूट होणार नाही. त्याचबरोबर वीज बिलामध्ये विविध आकारणे लावून बिलाचा आकडा वाढत आहे. याचा भार ग्राहकांना भुरदंड असून यामुळेही ग्राहकांची प्रचंड आर्थिक लूट होत आहे.
त्यामुळे नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित बंद करावे, ज्या ग्राहकांच्या ज्यादा बील आल्याच्या तक्रारी असतील त्या तक्रारींच्या चौकशी करून त्वरित निपटारा करावा, तसेच वीज बिलातील स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, वीज शुल्क 21% हे सर्व शुल्काची आकारणी बंद करून मूळ वीज वापराचे बिल द्यावे अन्यथा जनहितार्थ आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराशी या निवेदना द्वारे देण्यात आला आहे.
राजकिशोर मोदी, मनोज लखेरा, महादेव आदमाने, गणेश मसने, कमलाकर हेडे, दिनेश भराडिया, खलील जाफरी, रफिक गवळी, सय्यद रशिद, शरद काळे, शेख असलम, तौसिक सिद्धीकी, मतीन जरगर यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
