जनसंवाद बैठकीच्या माध्यमातून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नागरिकांची मने जिंकली पोलीसखात्यालाही सहकार्य करण्याचे नागरिकाला केले आवाहन
जनसंवाद बैठकीच्या माध्यमातून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी नागरिकांची मने जिंकली
पोलीसखात्यालाही सहकार्य करण्याचे नागरिकाला केले आवाहन
आंबजोगाई (प्रतिनिधी)
बीड जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री. नवनीत काँवत यांनी आज अंबाजोगाई शहरात येऊन साधलेल्या जनसंवाद बैठकीत उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या काही समस्यावर जागेवरच कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशित करत उपस्थितांची मने जिंकली आणि नागरिकांनी पोलीस खात्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस
मा.श्री. नवनीत काँवत (भा.पो.से) (पोलीस अधिक्षक, बीड) व श्रीमती चेतना तिडके (म.पो.से) (अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई), केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या जनसंवाद बैठकीस शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले , बर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने, परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचणं, परळी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, परळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मजहर सय्यद यांच्या सह या सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर आप्पा मोदी, राजेसाहेब देशमुख, दत्तात्रय आंबेकर, ज्ञानोबा केंद्रे (परळी), श्रीहरी मुंडे (परळी ), ऍड इस्माईल गवळी, ऍड बाबुराव तिडके, डॉ राजेश इंगोले, अशोक पालवे, महादेव आदमाने, व्यंकटेश चामनर, धिमन्त राष्ट्रपाल भगवान दराडे, लक्ष्मण गोरे, शेप यांच्या सह उपविभागातील विविध गावचे नागरिक व महिलांनी आपल्या पंचक्रोशीतील समस्यावर प्रकाश टाकला. ज्यामध्ये अंबाजोगाई शहरातील विस्कटलेली वाहतूक व्यवस्था व यासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा, स्वतंत्र सायबर शाखा कार्यरत कराव्यात. अपुरे संख्याबळ असल्याने चोऱ्यांचा तपास लावण्यात अडचण होते, अनेक गुनह्याचा तपास होत नाही, व्यापारी सामान रस्त्यावर ठेवत असल्याने अतिक्रमन वाढते आहे. निवासी वसाहती मध्ये औद्योगिक प्रकल्प आहेत ते बंद करावे, शहरात करंकारक्षय वाजणाऱ्या डीजेवर बंधने आणली जावी, प्लॉटिंगचे फ्रॉड करणारी टोळी शहरात कार्यरत आहे त्यावर प्रतिबंद आनावेत. ज्ञानराधा मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटच्या मालमत्ता जप्त करून ग्राहकांच्या ठेवी मिळवून द्याव्या, अपहार करणाऱ्या व्यक्तिवर कार्यवाही करावी. नागरिकांनीही जबाबदारीची भान राखावी, शहरात नशेखोर युवक वाढत आहे. शहरात शेंडी धारी, टिळक धारी सारख्या गुन्हेगारांचा वचक वाढतो आहे, शहर व तालुक्यातील मटका, गुटखा, जुगार बंद करावेत, गावची दारू बंद करावी या सह कौटंबिक समस्या माननीय नवनीत कावत यांच्या समोर व्यक्त केल्या.
सर्व उपस्थित त्यांना मार्गदर्शन करत असताना मार्गदर्शन करतेवेळी नवनीत का व त्यांनी मागील वर्षाच्या तुलनेत खून, हाणामाऱ्या, चोऱ्या, दरोडे यासह सर्व प्रकारच्या गुन्हे मध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून सर्वत्र अवैध धंद्यावर कार्यवाही सुरू आहे. मागील पाच महिन्यात गुंडांच्या 5 डोळ्यावर मोका अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून 12 गुन्हेगारावर झोपडपट्टी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 650 पोलीस कर्मचाऱ्यांच्या तालुक्याच्या बाहेर बदल्या करण्यात आले असून पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे यापुढे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांना हवी ती मदत देण्यास पोलीस यंत्रणा सक्षम राहणार असून गुन्हेगारीवर वाचक राहण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग वाढवण्यात आली असून अंबाजोगाई शहरात सर्वत्र सीसीटीव्ही लावले जात आहेत. आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिक, व्यापारी यांनीही आपल्या अवतीभवती सिसिटीव्ही लावले तर गुन्हेगारी कमी मदत होईल. नागरिकांनीही आपल्या नैतिक जबाबदारी पालन करून पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे. नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 9225092800 यावर संपर्क करावा असे आवाहनही नवनीत कावत यांनी यावेळी केले. या जनसंवाद बैठकीस अंबाजोगाई व परळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 288